IND vs ENG : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना रविवारी मुंबईत खेळला गेला. इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
निर्धारित 20 षटकांत 126 धावा करून इंग्लंडचा संघ गारद झाला. या लक्ष्याचा पाठलाग करताना हरमनप्रीत कौरच्या सेनेने 5 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. मात्र या विजयासह भारताने घरच्या मैदानावर ही मालिका 2-1 अशी गमावली.
IND vs ENG : अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने निर्धारित 20 षटकात भारतासमोर 127 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात भारताला चांगली सुरुवात करता आली नाही. कारण पहिला धक्का 11 धावांच्या स्कोअरवर सलामीवीर शेफाली वर्माच्या रूपाने बसला. शेफाली 6 चेंडूत 6 धावा करून स्वस्तात बाद झाली.
त्यानंतर स्मृती मानधना आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी भारताचा डाव पुढे नेला. या दोन खेळाडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 50 हून अधिक धावांची भागीदारी झाली. ज्यामध्ये मंधानाने 48 आणि रॉड्रिग्जने 29 धावांचे योगदान दिले. त्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करण्यात भारताला यश आले. 19 व्या षटकात भारताचा डाव गडगडला असला तरी 11 चेंडूत 11 धावा करायच्या होत्या. अशा स्थितीत 23 वर्षीय अमनजोत कौरने 4 चेंडूत 10 धावा करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.
गोलंदाजीत श्रेयंका पाटील आणि सायका इशाक चमकल्या
या सामन्यात भारतीय गोलंदाजी कौतुकास पात्र आहे. कारण इंग्लंडचा संघ सलग 2 सामने जिंकला होता. तिसऱ्या सामन्यात त्यांना रोखणे भारतासाठी कठीण होते. पण भारतीय गोलंदाजांनी इंग्लड संघाला रोखून दाखवले.
फिरकी गोलंदाज श्रेयंका पाटीलची जादू पाहायला मिळाली. तगडी गोलंदाजी करताना तिने 4 षटकात 19 धावा देत 3 बळी घेतले. तर सायका इशाकने 4 षटकात 22 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय अमनजोत कोर आणि रेणुका सिंगने 2-2 विकेट घेतल्या.
INDW vs ENG : भारतीय संघ क्लीन स्वीपपासून वाचला
या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने बरीच निराशा केली. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला सामना 38 धावांनी गमावला होता, तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा डाव 80 धावांत गुंडाळला गेला आणि इंग्लंडने हा सामना 4 विकेटने जिंकला.
क्लीन स्वीपच्या इराद्याने मुंबईत दाखल झाल्यावर इंग्लंडची स्वप्ने धुळीस मिळाली ही चांगली गोष्ट होती. तिसऱ्या सामन्यातील विजयामुळे भारताला मालिकेत 2-1 असा पराभवाचा सामना करावा लागला.