Rohit Sharma : आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये भारताने विजयी मोहीम सुरू ठेवली. भारतीय संघाने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 42.5 षटकांत 191 धावांत गारद झाला. हे लक्ष्य गाठण्यात भारताला कोणतीही अडचण आली नाही. त्यांनी अवघ्या 30.3 षटकांत तीन विकेट्स गमावून सामना जिंकला. विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला ते जाणून घेऊया.
IND vs PAK : रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहने इतिहास रचला, सामन्यात बनले 13 मोठे रेकॉर्ड्स
Rohit Sharma ने सामन्यानंतर ही माहिती दिली
टीम इंडियाने आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये विजयी मोहीम सुरू ठेवली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने मोठ्या फरकाने विजय मिळवला. या सामन्यात भारतीय गोलंदाजी अप्रतिम होती.
एकेकाळी पाकिस्तान मोठी धावसंख्या करण्यात यशस्वी होईल असे वाटत होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी एकामागून एक विकेट्स काढल्या. भारतीय संघ जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा रोहित शर्माने अप्रतिम खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. या सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला कि,
“आजही गोलंदाजांनीच आमच्यासाठी सामन्याचा पाया रचला. मला वाटत नाही की ती 190 ची खेळपट्टी होती. एकेकाळी आम्हाला 280 होतील असे वाटत होते. ज्याला गोलंदाजी मिळाली त्या प्रत्येकाने विकेट घेण्यात साथ दिली.
आमच्याकडे सहा खेळाडू असे आहेत जे बॉलिंगने चांगली कामगिरी करू शकतात. तेथेही कर्णधार म्हणून माझे काम महत्त्वाचे आहे. कारण आता परिस्थिती काय आहे आणि कोणाला कोना समोर गोलंदाजी द्यायची हे देखील महत्वाचे आहे.”
“आम्हाला काय करायचे आहे याबद्दल आम्ही अगदी स्पष्ट होतो. कोण कुठे फलंदाजी करेल या द्विधा मनस्थितीत मला पडायचे नव्हते. जास्त उत्तेजित देखील व्हायचे नव्हते आणि खूप निराश देखील व्हायचे नव्हते.
संतुलित खेळ करून शांततेत पुढे जायचे होते आणि आम्ही तेच केले. आपल्या समोर येणारा प्रत्येक विरोध गुणवत्तेचा असतोच त्यामुळे आम्हाला चांगले खेळायचे आहे आणि त्यावरच आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत.“
भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संपूर्ण डाव 42.5 षटकांत 191 धावांतच आटोपला. पाकिस्तानने दिलेल्या केवळ 192 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या वतीने कर्णधार रोहित शर्माने 63 चेंडूत 86 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 30.3 षटकात 3 विकेट्स गमावून पाकिस्तानचा पराभव केला.