Rishabh Pant : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या अपघातानंतर तो आजतागायत क्रिकेटमध्ये परतू शकलेला नाही.
पण आता तो बरा झाला असून लवकरच क्रिकेटमध्ये परतणार आहे. मात्र, तो क्रिकेटमध्ये कधी आणि कोणत्या सिरीज मध्ये पुनरागमन करणार आहे, हे त्याने अद्याप स्पष्ट केलेले नाही. पण त्याच्या पुनरागमनानंतर या खेळाडूला कसोटी खेळणे कठीण होऊ शकते.
इंग्लंडला धोका देऊन Jofra Archer आता या देशासाठी खेळणार, कारण जाणून तुमचा विश्वास बसणार नाही
Rishabh Pant च्या पुनरागमनाने या खेळाडूची कारकीर्द संपुष्टात
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार अपघात झाला होता, त्यात तो गंभीर जखमी झाला होता. पण आता त्याच्या पुनरागमनानंतर ज्या खेळाडूची कसोटी कारकिर्द धोक्यात येणार आहे तो दुसरा कोणी नसून इशान किशन आहे.
इशानचा यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पंत संघात परतल्यावर ईशानला खेळणे कठीण होऊ शकते. कसोटी संघात पंतची जागा सुरक्षित आहे कारण त्याने कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
Rishabh Pant कधी परतणार?
ऋषभ पंत जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर आहे. सध्या तो एनसीएमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. पण आगामी आयपीएलमध्ये तो भाग घेणार असल्याचे वृत्त आहे.
आयपीएलला अजून तीन ते चार महिने बाकी आहेत. त्याला बरे होण्यासाठी काही दिवस लागतील. यापूर्वीही त्यांनी तसे संकेत दिले आहेत. पंत त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांना त्याच्या तब्येतीबद्दल सतत अपडेट देत असतो.